भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.
योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत :
- विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डाशी संलग्न असावे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजने अंतर्गत लाभ
- स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असेल अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
- बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थी घेऊ शकतात.
- लाभार्थी विद्यार्थ्यांना घर, राहणे आणि इतर खर्चासाठी शासनाकडून दरवर्षी ५१,००० ची आर्थिक मदत दिली जाईल.
- स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता ११ वी आणि १२ वी मध्ये अभ्यास सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
- आणि तुम्ही डिप्लोमा प्रोफेशनल आणि नॉन-प्रोफेशनल कोर्समध्ये अर्ज करण्यास पात्र असाल.
0 Comments